AI म्हणजे काय? | AI in Marathi | कृत्रिम बुद्धिमत्ता

 जेव्हा यंत्र लिहू लागते....



AI म्हणजे काय ?

AI म्हणजेच Artificial Intelligence. ज्याला आपण मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. हे एक असे तंत्रज्ञान आहे जे माणसाप्रमाणेच लिहू शकतं, बोलू शकतं, वाचू शकतं, आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही देऊ शकतं आणि ते सुद्धा तुम्हाला हवं तसं.

एवढंच नाही तर AI इतकं वेगवान आहे की आपण दिलेलं काम ते अगदी काही सेंकदात पूर्ण करून देतं. व्हिडिओ तयार करणे, दिलेला मजकूर ऑडिओ स्वरूपात तयार करून देणे, नवीन इमेज तयार करणे, फोटो एडिट करणे, संवाद साधणे, गप्पा मारणे, स्क्रिप्ट तयार करून देणे, यासारखी असंख्य कामे AI चुटकीसरशी करून देतं.


आणि म्हणूनच AI ने अगदी कमी वेळात संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे.दिवसेंदिवस याचा वापर खूप वाढत आहे. AI विकसित करणाऱ्या कंपन्या रोज या तंत्रज्ञानामध्ये अधिकाधिक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.



AI चा शोध कोणी लावला ?

John Mac Carthy ( जॉन मॅककार्थी - अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ ) यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली.
जॉन मॅककार्थी यांनी 1956 मध्ये Dartmouth Conference मध्ये 'Artificial Intelligence' हा शब्द सर्वप्रथम वापरला. आणि या conference मध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असं प्रस्तावित केलं की,
‘ मानवी बुद्धीप्रमाणेच विचार करणारी मशीन तयार करता येईल.’
याशिवाय,
Allen Newell ( ॲलन नेवेल) , Herbert Simon ( हर्बर्ट सायमन) , Marvin Minsky ( मार्विन मिन्स्की) या तज्ज्ञांचाही AI च्या विकासात फार मोठा वाटा आहे. अधिकृतपणे John MacCarthy यांना AI संकल्पनेचे जनक मानतात.


AI लेखक की सहलेखक?

मजकूर तयार करून देणं, प्रेझेंटेशन बनवणं, निबंध, पत्र, जाहिराती इ. कामे AI प्रभावीपणे करू शकतं आणि त्यामुळे मानवी सर्जनशीलतेचे महत्व जलदगतीने कमी होऊ लागलं आहे. पूर्वी ज्या लिखाणाच्या कामासाठी अनेक पुस्तकं वाचावी लागत होती, अनेक संदर्भग्रंथ वाचावे लागत होते, खूप मेहनत करावी लागत होती तेच काम आता अगदी कमी वेळात आणि प्रभावीरीत्या AI करत आहे.

जे काम करण्यासाठी लेखक आपली सर्व सर्जनशीलता पणाला लावतो, आपल्या भावना, मते, विचार, दृष्टिकोन, अनुभव यांची सांगड घालून एका दर्जेदार साहित्याची निर्मिती करतो त्या साहित्याची आणि ज्ञानाची तुलना यंत्रनिर्मित मजकुराशी कशी होऊ शकते?

AI तर आता कथा, कविता, निबंध, लघुलेख अशा सर्वच गोष्टी तयार करून देते. पण भावनांचं काय?
एखादी कविता किंवा कथा लिहिण्यासाठी लेखकाने वापरलेली सर्जनशीलता, शब्द, भावना, रस, प्रेरणा या सर्व गोष्टी AI देऊ शकतं का? निश्चितपणे नाही.

शेवटी हे एक तंत्रज्ञान आहे. याचं नावच कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, मग ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी परिणाम कसे काय देऊ शकेल?

AI आपल्याला नवीन कल्पना देतं, माहित देतं. अगदी एखाद्या लेखकासारखाच मजकूर तयार करून देतं. तो आपला एक सर्जनशील मित्र/ लेखनात मदत करणारा सहलेखक होऊ शकतो. मात्र लेखक होऊ शकत नाही.

लेखकाकडे असणारी प्रतिभा, प्रचंड अनुभवांचा साठा, भावभावनांचे मिश्रण, शब्दसंपत्ती, प्रेरणा, सर्जनशीलता, स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता आणि या सर्व गोष्टी कागदावर उतरवणं हे काम कोणतीही कृत्रिम बुद्धिमत्ता कधीही करू शकणार नाही.




लेखक विरुद्ध यंत्र


आज लिखाणाचं जग एका वेगळ्याच वळणावर उभं आहे. एकीकडे अनुभव, भावना आणि भाषेचा आत्मा जपणारे लेखक आणि दुसरीकडे तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार म्हणजेच AI.
पण लेखन म्हणजे फक्त शब्दांचा खेळ आहे का ?

लेखन म्हणजे फक्त हवा तेवढा मजकूर भरभर टाईप करून देणं का?

लेखन म्हणजे केवळ कमी वेळात जास्तीत जास्त माहिती निर्माण करणं असा याचा अर्थ होतो का?

नाही…

लेखन म्हणेज आपल्या भावनांनी शब्दांशी केलेला संवाद…
लेखन म्हणजे लेखकाचा वैचारिक प्रवास…
लेखन म्हणेज लेखकाची बौद्धिक आणि भावनिक बुद्धिमत्ता…..
लेखन म्हणेज लेखकाचे सामाजिक भान…
आणि 

लेखन म्हणजे माणसाने माणसाशी केलेला संवाद..

AI हे लेखकाच्या जागी नाही तर त्याच्या शेजारी उभं राहाणारं एक साधन असू शकतं - सुधारणा करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी .अंतिमतः निर्णय मात्र लेखकाचाच.. त्यामुळे हा संघर्ष नसून ही एक मैत्री आहे.

एक नवी सर्जनशील मैत्री…

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.