जेव्हा यंत्र लिहू लागते....
AI म्हणजेच Artificial Intelligence. ज्याला आपण मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. हे एक असे तंत्रज्ञान आहे जे माणसाप्रमाणेच लिहू शकतं, बोलू शकतं, वाचू शकतं, आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही देऊ शकतं आणि ते सुद्धा तुम्हाला हवं तसं.
एवढंच नाही तर AI इतकं वेगवान आहे की आपण दिलेलं काम ते अगदी काही सेंकदात पूर्ण करून देतं. व्हिडिओ तयार करणे, दिलेला मजकूर ऑडिओ स्वरूपात तयार करून देणे, नवीन इमेज तयार करणे, फोटो एडिट करणे, संवाद साधणे, गप्पा मारणे, स्क्रिप्ट तयार करून देणे, यासारखी असंख्य कामे AI चुटकीसरशी करून देतं.
आणि म्हणूनच AI ने अगदी कमी वेळात संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे.दिवसेंदिवस याचा वापर खूप वाढत आहे. AI विकसित करणाऱ्या कंपन्या रोज या तंत्रज्ञानामध्ये अधिकाधिक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
AI चा शोध कोणी लावला ?
John Mac Carthy ( जॉन मॅककार्थी - अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ ) यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. जॉन मॅककार्थी यांनी 1956 मध्ये Dartmouth Conference मध्ये 'Artificial Intelligence' हा शब्द सर्वप्रथम वापरला. आणि या conference मध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असं प्रस्तावित केलं की,AI लेखक की सहलेखक?
लेखक विरुद्ध यंत्र
पण लेखन म्हणजे फक्त शब्दांचा खेळ आहे का ?
लेखन म्हणजे फक्त हवा तेवढा मजकूर भरभर टाईप करून देणं का?
लेखन म्हणजे केवळ कमी वेळात जास्तीत जास्त माहिती निर्माण करणं असा याचा अर्थ होतो का?
नाही…
लेखन म्हणेज आपल्या भावनांनी शब्दांशी केलेला संवाद…
लेखन म्हणजे लेखकाचा वैचारिक प्रवास…
लेखन म्हणेज लेखकाची बौद्धिक आणि भावनिक बुद्धिमत्ता…..
लेखन म्हणेज लेखकाचे सामाजिक भान…
आणि
लेखन म्हणजे माणसाने माणसाशी केलेला संवाद..
AI हे लेखकाच्या जागी नाही तर त्याच्या शेजारी उभं राहाणारं एक साधन असू शकतं - सुधारणा करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी .अंतिमतः निर्णय मात्र लेखकाचाच.. त्यामुळे हा संघर्ष नसून ही एक मैत्री आहे.